रामभक्त हनुमान

एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?’ तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.’ हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.

मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ? मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते. रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता. म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता. आपणसुद्धा सेवा करायला पटकन पुढे आलो, तर देवाची लाडकी मुले होऊ.

हनुमानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !