Menu Close

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत हनुमान मंदिरासमोर मुसलमानांनी दिल्‍या ‘सर तन से जुदा’च्‍या घोषणा

४० जणांविरुद्ध गुन्‍हा नोंद

  • उत्तरप्रदेशमध्‍ये भाजपचे आणि तेही योगी आदित्‍यनाथ यांचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान मंदिरासमोर अशा प्रकारची धमकी देण्‍याचे धाडस करतात, तर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, माकप आदी हिंदुद्रोही पक्षांच्‍या राज्‍यात हिंदूंची काय स्‍थिती होत असेल, हे लक्षात येते ! हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी देशाला हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍याला पर्याय नाही !  
  • हिंदूंना ठार करण्‍याची धमकी देणार्‍या अशा धर्मांधांना अटक करून त्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! -संपादक

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील रावतपूरमध्‍ये श्री हनुमान मंदिरासमोर मोहरमची  मिरवणूक पोचल्‍यावर मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्‍या (शिरच्‍छेदाच्‍या) घोषणा देण्‍यात आल्‍या. यातून येथे वातावरण बिघडवण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आल्‍यावरून पोलिसांनी ४० जणांवर गुन्‍हा नोंदवला आहे. या संदर्भातील व्‍हिडिओच्‍या आधारे पोलिसांनी हा गुन्‍हा नोंदवल्‍याचे साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले.

भाजपच्‍या नगरसेविकेच्‍या घराबोहरी देण्‍यात आल्‍या होत्‍या जिहादी घोषणा !

कानपूरच्‍या परमपुरवा परिसरातही मोहरमच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी भाजपच्‍या नगरसेविका विद्या वर्मा यांच्‍या घराबाहेर मुसलमानांनी ‘भारतात रहायचे असेल, तर ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्‍हणावे लागेल’ अशा घोषणा दिल्‍या होत्‍या. या घटनेचीही चौकशी चालू आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News