Menu Close

बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना आश्रय देण्याची मागणी

‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांचे भारत सरकारला आवाहन

मुंबई – बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना भारतात आश्रय द्या. त्यांचे हत्याकांड होतांना भारत सरकारने गप्प बसणे योग्य नव्हे. त्यांना वाचवणे आवश्यक आहे. हे करतांना मुसलमान देशात घुसता कामा नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे पत्र ‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.

भारतातील बौद्ध, शीख समाजाचे नेते आणि जैन मुनी यांनी भारत सरकारवर यासाठी दबावा टाकावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपल्या शेजारच्या देशात त्यांची सामूहिक हत्या होत असतांना सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News