स्वातंत्र्यप्राप्तीच्या सर्वोच्च ध्येयाने आनंदाने मृत्यूला कवटाळणारे क्रांतीकारक !

फाशीपूर्वी एका सहकार्‍याने भगतसिंगांना विचारले, ‘‘सरदारजी, फांसी जा रहे हो । कोई अफसोस तो नही ?’’ यावर गडगडाटी हसून भगतसिंग म्हणाले, ‘‘अरे, या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना ‘इन्किलाब झिंदाबाद’ ही घोषणा सर्वत्र पोहोचावी’, एवढा विचार केला होता. ही घोषणा माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या कंठातून निघाली की, तो घोष या साम्राज्यावर घाव घालीत राहील. या छोट्या आयुष्याचे याहून मोठे काय मोल असेल ?’’

राजगुरु म्हणाले, ‘‘बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळ्या शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दुःख वाटते.’’

संदर्भ: दैनिक सनातन प्रभात