Menu Close

बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा केंद्रसरकारने नाकारला !

भारत शासनाचा हिंदुद्वेष !

मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

Ravindra-Ghosh
श्री. रवींद्र घोष

गोवा येथे १९ ते २५ जून या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात प्रतिवर्षी भारतातील हिंदुत्वनिष्ठांसह नेपाळ, बांगलादेश येथील हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठही सहभागी होतात. बांगलादेशमधून बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. रवींद्र घोष हे प्रतिवर्षी या हिंदू अधिवेशनात सहभागी होत असतात; मात्र या वर्षी श्री. घोष यांना या अधिवेशनासाठी भारतात येण्यासाठी भारत शासनाकडून व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *