Menu Close

देशात सर्वांसाठी एक कायदा आणि एकच राज्यघटना असली पाहिजे ! – पवन केसवानी, प्रबुद्ध नागरिक मंच, छत्तीसगड

पवन केसवानी, संयोजक, प्रबुद्ध नागरिक मंच, दुर्ग, छत्तीसगड

विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : लांगूलचालनाच्या नावावर देशाशी खेळ चालू आहे. लव्ह जिहाद, गोहत्याबंदी कायदा आदी अनेक विषयांवर लांगूलचालनाचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण देश आतून पोकळ बनला आहे. असे ठाम प्रतिपादन छत्तीसगड येथील प्रबुद्ध नागरिक मंचचे संयोजक पवन केसवानी यांनी अखिल भारतीय हिंदू संघटक अधिवेशनात केले.

पवन केसवानी पुढे म्हणाले कि, लांगूलचालन हे एक ध्येय ठेवून त्याच्या विरोधात जनतेमध्ये जागृती करून संघटितपणे विरोध केला पाहिजे आणि देशात एक कायदा, एक राज्यघटना बनवण्यासाठी शासनाला भाग पाडले पाहिजे. आज गोहत्याबंदीचे कायदे होतात, पण प्रत्यक्षात त्याचे पालन होतांना दिसत नाही. सर्व संप्रदाय गोहत्या, तसेच हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात एका व्यासपिठावर एकत्र आले, तर गोहत्येसारख्या समस्या नष्ट होऊ शकतात. लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे हा विषय बेधडकपणे समाजासमोर ठेवला पाहिजे. त्याला उघडपणे विरोध झाला पाहिजे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *