![maharana_pratap_battalion](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2016/06/maharana_pratap_battalion.jpg)
मुंबई : आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आतंकवाद्यांना बेल आणि हिदूंना जेल अशा घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. कारागृहात असणारे निर्दोष साधू-संत आणि धर्मरक्षक यांची त्वरित सुटका करावी, त्यांच्यावरील खटले रहित करण्याची मागणी केली. हिंदू महासभा, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, हिंदुराष्ट्र सेना, हिंदू राष्ट्र जनजागृती संघटन, हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग होता साधू, संत आणि हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या. या वेळी बटालियनचे अध्यक्ष श्री. ठाकूर अजयसिंह सेंगर, श्री. एकनाथ मुंबईकर, श्री. निखिल वर्मा यांनी मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात