Menu Close

हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत ! – अधिवक्ता अनंत देशपांडे

वणी (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदूसंघटन मेळावा

wani_yavatmal_melava
डावीकडून सौ. भक्ती चौधरी, दीपप्रज्वलन करतांना अधिवक्ता अनंत देशपांडे आणि श्री. श्रीकांत पिसोळकर

वणी (जिल्हा यवतमाळ) : स्वातंत्र्यानंतर सर्व शासनकर्त्यांनी हिंदूंचा अवमान करून हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच कार्य केले. गांधी-नेहरू यांच्यासह काँग्रेसने हिंदु धर्माची सर्वांत मोठी हानी केली आहे. अन्य धर्मियांना त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार्‍या काँग्रेसने हिंदूंना मात्र धर्मशिक्षण मिळू दिले नाही. पर्यायाने या देशातील हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच काम केले आहे. या कठीण परिस्थितीत हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत आणि त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अथक प्रयत्न करत आहे, मी त्यांना वंदन करतो, अशा शब्दांत अधिवक्ता श्री. अनंत देशपांडे यांनी उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती चौधरी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. मेळाव्याला ३०० धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *