Menu Close

जमावाने केलेल्या गोळीबारात ४ धर्मांध ठार !

उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये धर्मांधांकडून हिंदु मुलींची छेडछाड

बिजनौर (उत्तरप्रदेश) : बिजनौरच्या पेदा गावात हिंदु मुलींची धर्मांधांकडून छेडछाड करण्याच्या घटनेवरून जमावाने केलेल्या गोळीबारात अहसान, सरताज, अनीस आणि रिजवान हे चौघे ठार झाले, तर सलीम, अंसार, शाहनवाज, अलाउद्दीन, फुरकान आणि सरफराज यांसह एकूण १२ जण घायाळ झाले. यामुळे येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळी शाळेत जात असतांना या मुलींची छेड काढण्यात आली. गोळीबारात ठार झालेल्यांच्या नातेवाइकांनी नजीबाबाद मार्ग रोखून धरला आणि वाहनांची तोडफोड केली. तसेच पोलिसांसमोरच त्यांनी हत्येचा सूड हत्या करूनच घेऊ, अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *