Menu Close

उरी येथील आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा ! – सुधाकर चौधरी

untitled

चोपडा : पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जम्मू खोर्‍यातील उरी येथे केलेल्या आक्रमणात १८ भारतीय सैनिकांना प्राण गमवावे लागले. या आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता आता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सुधाकर चौधरी यांनी केले. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. आंदोलनानंतर समितीच्या वतीने तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदनही देण्यात आले. निवेदन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासाठीही पाठवण्यात आले.

निवेदन देतांना भाजपचे माजी शहाराध्यक्ष श्री. राजू शर्मा, श्री. राजू ढाबे, श्री. अनिल पालीवाल, शिवसेना माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, मनसे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, नगरसेवक प्रमोद भाट, तसेच समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *