Menu Close

भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकने आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रांचे स्थलांतर केले !

  • डावपेचात भारतापेक्षा हुशार असलेला पाकिस्तान !
  • भारताने जरी आता पाकवर आक्रमण केले, तरी आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणकेंद्रांना काहीही हानी होणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

pak_terrorism

नवी देहली : उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून पाकमधील आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रावर आक्रमण होण्याच्या भीतीने पाकने १६-१७ प्रशिक्षण केंद्रे स्थलांतरित केली आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. ही प्रशिक्षणकेंद्रे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही केंद्रे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळून आणि पाकव्याप्त काश्मीरमधून पाकच्या आतील भागात नेण्यात आली आहेत. पाकचे सैन्य आणि आयएस्आय ही गुप्तचर संस्था यांच्या साहाय्याने ती स्थलांतरित करण्यात आली आहेत. मनसेहरा आणि मुझफ्फराबाद येथील ४ केंद्रे स्थलांतरित करण्यात आली आहेत. काही केंद्रांना सैन्याच्या तळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *