Menu Close

तमिळनाडूमध्ये श्री गणेशचतुर्थीनंतर धर्मांधांनी घडवून आणलेली हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि त्यांच्या हत्या !

dharmandh2

तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय !

साम्यवादी, पुरोगामी, ख्रिस्ती, मुसलमान त्यांच्या नेत्यांच्या हत्या झाल्यावर आकाशपाताळ एक करतात, तर हिंदु आणि त्यांच्या संघटना निष्क्रीय रहातात !

१. १०.०९.२०१६ – हिंदु मन्नानीचे (हिंदु आघाडीचे) जिल्हा अध्यक्ष श्री. महेश यांच्या वेळ्ळूर येथील निवासस्थानावर पेट्रोल बाँब फेकण्यात आला.

२. १०.०९.२०१६ – हिंदु मन्नानीचे (हिंदु आघाडीचे) कार्यकर्ता श्री. श्रीनिवासन यांच्या वेळ्ळूर येथील वाहतूक कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. यामध्ये एक बस जळून खाक झाली.

३. ११.०९.२०१६ – हिंदु मन्नानीचे (हिंदु आघाडीचे) कोषाध्यक्ष श्री. षण्मुगम् यांच्या तिरुपूर येथील पायमोजे आणि त्यासारख्या इतर वस्तूंच्या आस्थापनावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. त्यामध्ये १५ लक्ष रुपयांची हानी झाली.

४. १४.०९.२०१६ – धन्या नावाची एक हिंदु मुलगी लव्ह जिहादची बळी ठरली. या हिंदु मुलीचा एका हिंदु मुलाशी विवाह ठरला होता; मात्र शकीर नावाच्या एका जिहाद्याने लव्ह जिहादचा प्रयत्न फसल्याने तिची निर्घृण हत्या केली.

५. १९.०९.२०१६ – तमिळनाडूमधील विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा सचिव सुरी यांची धर्मांधांनी निर्घृण हत्या केली.

६. १९.०९.२०१६ – तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदु आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले.

७. २२.०९.२०१६ – हिंदु मुन्नानीचे (हिंदु आघाडीचे) प्रवक्ते शशिकुमार यांची त्यांच्या कोईम्बतूर येथील निवासस्थानी तीक्ष्ण शस्त्रांनी भोसकून अमानुष हत्या करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *