Menu Close

इचलकरंजी येथे हिंदूला तीन धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

  • धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

  • पीडित हिंदूचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

हिंदूंनो, धर्मांधांकडून मार सहन करण्यापेक्षा हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

murder_kill_dharmandh

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) : येथील बाळनगर, षटकोण चौकातील एका हिंदूला धर्मांध सलीम अत्तार, इरफान आणि वहिदा यांनी त्यांच्या घरात घुसून अमानुष मारहाण केली. त्यात ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्यांंना तेथून हाकलून लावले. (तक्रारही प्रविष्ट करून न घेणारे पोलीस धर्मांधांचे एकप्रकारे तुष्टीकरणच करत आहेत, असे म्हटल्यास वावगे काय ? हिंदूंनो, अशा पोलिसांची नावे सनातन प्रभातला कळवा ! अशा कर्तव्यचुकार पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे ! असे अकार्यक्षम पोलीस हे पोलीस दलाला कलंकच आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे धर्मांधांपासून मला संरक्षण मिळावे आणि तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित हिंदूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

१. धर्मांध सलीम अत्तार यांचे घर पीडित हिंदूंच्या शेजारी आहे. सलीमने हिंदूच्या जागेचे नियंत्रण मिळवून तेथे अनधिकृत बांधकाम करत होता. त्यामुळे हिंदूने जिल्हा न्यायालयात सलीम अत्तार याच्या विरोधात खटला प्रविष्ट केला होता. न्यायालयाने बांधकामाच्या कामास मनाई आदेश दिला. त्याचा राग मनात धरून अत्तार हिंदूला वेळोवेळी शिवीगाळ करून धमकी देत असे.

२. १३ ऑक्टोबरला दुपारी धर्मांध आणि त्याच्या साथीदारांनी हिंदूच्या घरात घुसून त्याला लोखंडी सळी आणि हत्यार यांनी मारहाण केली. हिंदूला वाचवण्यासाठी पुढे आलेली त्याची पत्नी आणि सून यांनाही त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. (उद्दाम धर्मांध ! हिंदूंनो, तुमच्या स्त्रियांचे धर्मांधांच्या तावडीतून रक्षण करण्यासाठी त्यांना स्वंसरक्षण प्रशिक्षण देण्याविना पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. पीडित हिंदू गंभीररित्या घायाळ स्थितीतच पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात भरती केले.

घायाळ हिंदूची साधी विचारपूसही न करणारे पोलीस निरीक्षक पवार, पोलीस हवालदार हत्तीगोटे आणि मस्के !

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पवार, पोलीस हवालदार हत्तीगोटे आणि मस्के यांनी हिंदूंची साधी विचारपूस केली नाही. उलट बळजोरीने पीडित हिंदूला काही समजण्याच्या आतच त्याची कोर्‍या कागदावर स्वाक्षरी घेतली. (अशा असंवेदनशील पोलिसांचा जनतेला कधीतरी आधार वाटेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) इतके मोठे आक्रमण होऊनही पोलिसांनी धर्मांधांना अटक केली नाही. हिंदूने ७-८ वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तुझा बांधकामाचा विषय असल्याने तू न्यायालयात जा, असे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.

पीडितांची वेळीच दखल न घेणार्‍या अशा पोलिसांवर न्यायालयाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पीडित हिंदूला पोलीस संरक्षण !

धर्मांधांनी हिंदूला पुष्कळ मारहाण केल्यानंतरही पोलिसांनी गुंडांवर अटकेची कारवाई न केल्यामुळे न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने पीडित हिंदूला पोलीस संरक्षण देण्याचा आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांचे त्यांना २८ ऑक्टोबरपासून संरक्षण देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *