Menu Close

केवळ ‘सर्जिकल स्ट्राईक’ नको, तर युद्धच करा ! – राजेश आवटे

नांगनूर (जिल्हा बेळगाव) येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली !

निपाणी (जिल्हा बेळगाव) : पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. अनेक सैनिकांना यामुळे हौताम्य पत्करावे लागले आहे. भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून पाकला धडा शिकवला आहे; मात्र एवढ्यावरच न थांबता सरळ युद्धच करून पाकिस्तानचे अस्तित्व मिटवून टाकावे, असे मत निपाणी येथील समाजसेवक श्री. राजेश आवटे यांनी व्यक्त केले. नांगनूर येथील छत्रपती संभाजीराजे चौक येथे श्रीराम सेनेच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा सैनिक नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्रीराम सेना शाखाप्रमुख सर्वश्री अमोल गुरव, कार्यकर्ते विजय पोवार, निवास पोवार, अभिनंदन भोसले, प्रशांत क्षीरसागर, सागर श्रीखंडे आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *