Menu Close

काही वर्षांत देशाची पुन्हा फाळणी होऊ शकते ! – हुकूम सिंह, खासदार, भाजप

एक भारत अभियान – कश्मीर की ओर अंतर्गत लक्ष्मणपुरी येथील हिंदु धर्मजागृती सभा

hukum-singh
हुकूम सिंह, खासदार, भाजप

लक्ष्मणपुरी (लखनऊ) – मी जिवंत असतांना देशाची फाळणी होणार नाही; मात्र येणार्‍या १० ते २० वर्षांमध्ये एखादा सय्यद अहमद खान जन्म घेईल आणि पुन्हा एक फाळणी व्हावी, असे म्हणेल, असे विधान भाजपचे खासदार हुकूम सिंह यांनी येथे केले आहे. एक भारत अभियान- कश्मीर की ओर या उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत सिंह बोलत होते. हा उपक्रम कैराना आणि काश्मीरमधील विस्थापित हिंदूंवर आधारित आहे. सर सय्यद अहमद खान मुस्लिम विद्यापिठचे संस्थापक होते. हुकूमसिंह पुढे म्हणाले, काश्मिरी पंडितांना स्वधर्मामुळे घरे सोडावी लागली त्यांना शांततापूर्वक त्यांच्या घरी पुन्हा आणणे, हे आमच्यासाठी आव्हान आहेे. कैरानामध्ये बहुतांश हिंदूंना घर सोडावे लागले. उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी एकत्र येऊन विस्थापितांचे सूत्र लावून धरायला हवे.

माजी खासदार रघुनंदन शर्मा म्हणाले की, सरकार जर त्यांना ४ पत्नी आणि ४० मुले जन्माला घालणे थांबवू शकत नसेल, तर कमीतकमी त्यांचा कबड्डी संघ बनवता येऊ शकतो. जर तुम्हीदेखील (हिंदू) मुसलमानांसारखे वागू लागलात, तर मग त्यांची संख्या आपोआप ४ वरून १ वर आणि ४० वरून ४ वर येईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *