Menu Close

आळंदी येथील वारकरी महाअधिवेशनात समस्त वारकर्‍यांची एकमुखी मागणी, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला !’

anis

आळंदी :  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सातत्याने सनातन हिंदु धर्म, धर्मपरंपरा, रूढी यांवर टीका करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला, अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या १२ व्या वारकरी महाअधिवेशनात करण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. (नुकतेच अंनिसने त्यांच्या मासिक आंदोलनात काही वारकर्‍यांना सोबत घेऊन वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी नाळ जोडू पहात असल्याचा दावा केला होता. आळंदी येथे वारकरी अधिवेशनात अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात केलेल्या ठरावामुळे मात्र अंनिसचे पितळ उघडे पडले ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या जोडीला सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करावीत, अशी आग्रही मागणीही या वेळी करण्यात आली. २५ नोव्हेंबर या दिवशी येथील श्री संत मोतीराम महाराज फळेकर फड या ठिकाणी हे महाअधिवेशन पार पडले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *