Menu Close

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

कार्यक्रमासाठी उपस्थित महिला

शिरवळ (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) : सध्या आधुनिकतेच्या नावाखाली धर्माचरण विसरल्याने हिंदु संस्कृती लोप पावत आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘लव्ह जिहाद’चे संकटही उभे आहे; म्हणूनच हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता यांनी केले. १ डिसेंबर या दिवशी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. छाया पवार आणि ४० हून अधिक महिला उपस्थित होत्या. मार्गदर्शनानंतर उपस्थित महिलांनी शिरवळ आणि विंग या गावांमध्ये धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *