Menu Close

सीरिया : अलेप्पोवर ४ वर्षांनंतर लष्कराचा ताबा, आतापर्यंत ३ लाख लोकांचा मृत्यू

अल्लेप्पो : सीरियातील अल्लेप्पो शहरावर लष्कराने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. वर्ष २०११ मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धातील आतापर्यंतचे लष्कराचे हे सर्वाधिक मोठे यश आहे. शहराला बंडखोरांपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आल्यानंतर सीरियाच्या लष्कराकडून ही घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर गेल्या एक महिन्यांपासून पूर्व अलेप्पोमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्षही संपुष्टात आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या सीरियन बंडखोरांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. या आंदोलनात आतापर्यंत ३ लाख १० हजार लोक मारले गेले आहेत.

तत्पूर्वी रेडक्रॉसने चार हजार बंडखोरांनी शहर सोडल्याचे म्हटले होते. गेल्या सहा वर्षांपासून बंडखोर आणि लष्करात सुरू असलेल्या या चकमकीत पूव अलेप्पोचे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान गत एक महिन्यात झाले होते. त्याचबरोबर सीरियन लष्कराने देशातील पाच प्रमुख शहर अलेप्पो, होम्स, हमा, दमिश्क आणि लताकिया या शहरांवर नियंत्रण मिळवले आहे.

हिमवर्षाव व थंडीमुळे येथील शहरे रिकामी करण्यास अडचणी येत आहेत. विस्थापितांना बसमध्येच तासन्तास वाट पाहावी लागत आहे. शहर रिकामे करण्याच्या शेवटच्या टप्प्यात बुधवारी व गुरूवारी रात्रीार चाललेल्या मोहिमेत सुमारे चार हजाराहून अधिक मुलांना कार, व्हॅनमधून पूर्व अलेप्पोतून शोधून काढण्यात आल्याचे रेडक्रॉसच्या प्रवक्त्याने सांगितले. या संपूर्ण अभियानात आतापर्यंत सुमारे ३४ हजार लोग अलेप्पोच्या हिंसाचाराने प्रभावित भागातून बाहेर काढण्यात आल्याचेही त्याने म्हटले.

गत एक महिन्यांपासून बंडखोर आणि सीरियन सैन्यात तीव्र संघर्ष सुरू होता. अखेर २०१२ पासून अलेप्पोवर ताबा असलेल्या बंडखोरांनी माघार घेतली. यामुळे राष्ट्राध्यक्ष असद यांचा हा मोठा विजय असल्याचे मानले जाते.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *