Menu Close

श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आयोजित हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी !

shrirangpatt
डावीकडून कु. भव्या गौडा, श्री. मोहन गौडा, श्री. दिनकर भट आणि सौ. तारा शेट्टी

भारतमातेच्या रक्षणार्थ हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

श्रीरंगपट्टण (कर्नाटक) – गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने राष्ट्राला केवळ भ्रष्टाचार, लूटमार, चोर्‍या, दंगली दिलेल्या आहेत. मतांच्या लांगूलचालनामुळे हिंदूंना महत्त्वच उरलेले नसल्यामुळे हिंदु असुरक्षित ठरले आहेत. धर्मांतर आणि हिंदुविरोधी कायदे यांमुळे हिंदुत्व नष्ट होत आहे; म्हणूनच भारतमातेच्या रक्षणार्थ हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, असे प्रतिपादन श्री. मोहन गौडा यांनी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, भारत स्वाभिमान न्यासाचे श्री. दिनकर भट, रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. तारा शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी हिंदूंनी धर्माचरणाच्या साहाय्याने समाजविघातक गोष्टींना नष्ट करणे ही काळाची आवश्यकता आहे, असे श्री. दिनकर भट म्हणाले. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन जिहादी धर्मांधांपासून हिंदु धर्माचे रक्षण करा, असे आवाहन कु. भव्या गौडा यांनी केले, तर सौ. तारा शेट्टी यांनी, धर्मरक्षण करणार्‍यांचे रक्षण धर्म अथवा ईश्‍वर करील, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *