![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2017/01/6Jan-2.jpg)
कोल्हापूर : पश्चिम बंगालमधील हिंदूंवर आक्रमण करणार्या मुसलमानांवर कठोर कारवाई करून हिंदूंचे संरक्षण करावे आणि त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी. बंगालमधील हिंदू असुरक्षित जीवन जगत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने हिंदूंना अजूनही न्याय मिळवून दिलेला नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागण्या समस्त हिंदूप्रेमी संघटनेच्या वतीने ६ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर शेळकंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी छत्रपती शाहूराजे फॉऊंडेशनचे सर्वश्री बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, किशोर घाडगे, भारत स्वाभिमानचे संजय पाटील, धर्माभिमानी संजय जासूद, भाजपचे बावडा मंडल प्रमुख डॉ. सदानंद राजवर्धन, हिंदू एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, युवा सेना माजी तालुका प्रमुख भाऊ चौगुले, इस्कॉनचे सुरेंद्र पुरेकर, प्रमोद जाधव, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात