Menu Close

चीनची धमकी : भारतासोबत युद्ध झाल्यास १० तासात आमचे सैनिक देहलीत पोहोचतील !

नवी देहली – ‘जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तर आमचे सैनिक १० तासात भारताची राजधानी देहलीपर्यंत पोहोचतील’ अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. दोन देशांमध्ये युद्ध झाले तर केवळ १० तासात पॅराशूटच्या सहाय्याने आमचे सैनिक राजधानी देहलीत पोहोचतील, असे चिथावणीखोर वक्तव्य चिनी मीडियाने केले आहे. इंटरनॅशनल स्पेक्टेटरने ट्वीटकरून याबाबत माहिती दिली.

भारताविरोधातील चिनी मीडियाचा हा उद्वेग काही नवा नाही आहे किंवा चिनी मीडियाने भारताला अशाप्रकारे धमकी देण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही चिनी मीडियाने भारताविरोधात आग उकळण्याची कामे केली आहेत. गुंतवणूक करण्यासाठी अॅपलसारख्या मोठ्या कंपन्या जेव्हा भारताकडे वळल्या त्यावेळीही चिनी मीडियाचा तिळपापड झाला होता.

स्त्रोत : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *