Menu Close

केवळ सण-उत्सवापुरते नव्हे, तर हिंदूंनी अखंड संघटित रहायला हवे ! – विनोद रसाळ

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन

PTue1(2)
मार्गदर्शन करतांना समितीचे श्री. विनोद रसाळ

सोलापूर : हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता केवळ सण-उत्सवांपुरते एकत्रित न येता अखंड संघटित रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी केले. बाळे येथील खंडोबा मंदिर आणि खानापूर येथे मकरसंक्रातीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. खंडोबा मंदिर येथे सर्वश्री मनोज लोंढे, राहुल स्वामी, शिवलिंग ढेकणे, निमिष सुतार, कपिल भांडेकर, शुभम देडे, सूरज कस्तुरे, देविदास कदम, श्रीकांत वाघमारे, मंजुनाथ येळवारमठ, रणधीर स्वामी, कपिल भांडेकर आणि योगेश घोडके यांसह ४० धर्माभिमानी उपस्थित होते. धर्मकार्यासाठी एकत्र येणार असल्याचे धर्माभिमान्यांनी या वेळी सांगितले. खानापूर येथे ८५ धर्माभिमान्यांनी याचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *