Menu Close

ख्रिस्ती मिशनऱ्यांचा पोकळ मानवतावाद !

मानवतावादाचा आव आणून गोरगरीब हिंदूंवर विनामूल्य औषधोपचार करणे, हिंदु मुलांसाठी अनाथालये काढणे आणि नंतर त्या हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणे, हे बहुतांशी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचे खरे स्वरूप आहे. अशा ख्रिस्ती मिशनऱ्यांना पुढील प्रश्न विचारा.

१. ‘मानवतावाद’ हाच शुद्ध हेतू असेल, तर त्यासाठी हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्याची आवश्यकता काय ?

२. जगभर फोफावलेल्या जिहादी आतंकवादामुळे सहस्रो निष्पाप लोकांची हत्या होत असतांनाही जिहादी आतंकवादाविरुद्ध आवाज का उठवत नाही ?

३. साम्राज्यविस्तार आणि स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे यांसाठी जगभरातील बहुतांशी आक्रमणे आणि युद्धे ख्रिस्ती राष्ट्रांमुळे झालेली असतांनाही त्या राष्ट्रांना मानवतावादाचा पाठ का वाचून दाखवत नाही ?

छळ-बळ-कपट यांद्वारे हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणार्याा ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विरोधात जागृती करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मपालनच आहे !’

– पू. (श्री.) संदीप आळशी (९.३.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *