Menu Close

भिवंडीत (जिल्हा ठाणे) क्षुल्लक कारणावरून शेकडो धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदू घायाळ !

भारतात सर्वत्र ‘छोटे पाकिस्तान’ निर्माण होऊ दिल्याचा हा परिणाम आहे. धर्मांधांची हिंदूंवर होणारी वाढती आक्रमणे वेळीच न रोखल्यास एक दिवस महाराष्ट्रातील शहारांची काश्मीरसारखी स्थिती होण्याचा दिवस दूर नाही ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्मांधांकडून हिंदूंवर वारंवार आक्रमणे होणे, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

भिवंडी : येथील शांतीनगर विभागातील गोविंदनगर परिसरात १८ मार्चला रात्री ९ वाजता एक लग्नाची वरात जात असतांना शेकडो धर्मांधांनी हिंदूंवर तलावारींच्या साहाय्याने आक्रमण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ८ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला असून ४ जणांना कह्यात घेण्यात आल्याची आणि ४ जण फरार असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी सनातन प्रभातच्या वार्ताहरास दिली. (शेकडो जणांनी हिंदूंवर आक्रमण केले असतांना केवळ चार धर्मांधांना कह्यात घेण्यात येते. अजून हिंदूंवर किती आक्रमणे होण्याची पोलीस वाट पहात आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) चार घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

१. लग्नाची वरात जात असतांना एक धर्मांध बेधुंदपणे दुचाकी चालवत वरातीच्या मध्ये आला. त्याच वेळी वरातीतील एका हिंदूच्या पायावरून दुचाकी गेली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर उलट तो धर्मांध युवक धावून आला आणि ‘‘तुम्हाला आता धडा शिकवतो’’ असे म्हणत वरातीतील हिंदूंशी बाचाबाची करू लागला. (धर्मांध एकटे असतांनाही हिंदूंशी असे उद्दामपणे वागतात, ते शासनाने एवढी वर्षे केलेल्या त्यांच्या लांगूलचालनाच्या जोरावरच, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. नंतर जवळपास १०० धर्मांधांनी तलवारी, दंडुकेे आणि इतर शस्त्रे घेऊन या हिंदूंच्या वरातीवर आक्रमण केले. त्यात १० हिंदु युवक घायाळ झाले. घायाळ झालेल्या हिंदूंमध्ये चिंटू चौगुले, राहुल चौगुले, पंकज गुप्ता, रामदास, आकाश, गुलाबचंद, आरती गुप्ता आणि लक्ष्मी गुप्ता आदींचा समावेश आहे.

३. या आक्रमणात धर्मांधांनी हिंदूंच्या दुकानातील सामानाची तोडफोड केली. नंतर तेथील हिंदूंनी त्यांची दुकाने बंद केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *