Menu Close

भोजशाळेनंतर उज्जैनच्या महाकाल मंदिराला वादग्रस्त ठरवण्याचे धर्मांधांचे षडयंत्र

मध्यप्रदेश शासन धर्मांधांचे हे षडयंत्र हाणून पाडणार का ? धर्मांधांपासून हिंदूंची मंदिरे वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !

महाकाल मंदिर, उज्जैन

उज्जैन : सिमी या आतंकवादी संघटनेचा गड असलेल्या उज्जैनमध्ये नुकतेच इस्लामिक संमेलन झाले. या संमेलनाला मोठ्या प्रमाणात मुल्ला-मौलवींची उपस्थिती होती. या ठिकाणी मुसलमान तरुणांना संमेलनाच्या स्वागत अभिभाषणाचे पुस्तके वाटण्यात आली. यात अनेक प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह गोष्टींसह औरंगजेबाने त्याच्या कार्यकाळात येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराला ७० बिघा भूमी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यातून धारच्या भोजशाळेनंतर धर्मांध शक्तींकडून जगप्रसिद्ध महाकाल मंदिरालाही वादग्रस्त करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे समोर आले आहे.

४ ते ६ मार्चच्या काळात हे संमेलन झाले. या संमेलनाच्या दुसर्‍याच दिवशी ७ मार्चला सकाळी शाजापूर जिल्ह्यात भोपाळ उज्जैन पॅसेंजर रेल्वे गाडीत बॉम्बस्फोट झाला. उज्जैनसारख्या मोठ्या तीर्थक्षेत्री नवीन वाद निर्माण करणे, इस्लामिक संमेलन होणे आणि त्याकडे गुप्तचर विभागाने दुर्लक्ष करणे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे समजले जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *