![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2017/04/dharashiv_hjs.jpg)
टकळ (जिल्हा धाराशिव) : येथे हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी जीवनात धर्माचे महत्त्व, धर्मावरील आघात आणि धर्माप्रती असलेले कर्तव्य यांवर मार्गदर्शन केले. येथील श्री. अविनाश पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘आमच्या गावात धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आम्हाला धर्मशिक्षणवर्गाची आवश्यकता आहे.’’ या वेळी गावात धर्मशिक्षण वर्ग घेण्याची मागणीही करण्यात आली. बैठकीला १२५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. प्रत्येकी १५ दिवसांनी तिथे वर्ग घेण्याचे निश्चित झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात