Menu Close

आज हिंदूंसमोर महाभयंकर संकटे असून ‘शौर्य’ हेच त्यावर उत्तर आहे ! – राहुल कदम

मार्गदर्शन करतांना श्री. राहुल कदम (१) आणि उपस्थित धर्माभिमानी हिंदू

विटा (जिल्हा सांगली) : देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवणार्‍या भारतियांची देशात न्यूनता नाही. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा अभिमान प्रत्येक भारतियाला आहे. इसिस, जिहादी आतंकवाद यांसह अनेक समस्या आज हिंदूंसमोर आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय समाजालाही तो ‘सिंह’ असल्याची, त्याचे शौर्य दाखवून देण्याची जाणीव करून द्यावी लागेल. हिंदू शौर्य दाखवू लागल्यास बॉम्बस्फोट करणार्‍यांचा देशच जगाच्या नकाशावरून नष्ट होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कदम यांनी केले. ते हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विटा येथील शिवमल्हार ग्रुप, शिवमल्हार नगर येेथे ‘शौर्य जागरण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. या वेळी शिवमल्हार ग्रुपचे सर्वश्री भानुदास बोडरे, अविनाश बोडरे यांसह ३० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *