Menu Close

हिंदूंच्या सर्व समस्यांचा अंत हिंदु राष्ट्रातच होणार ! – पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

शंकरपूर, उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदु दबंग सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

शंकरपूर, उज्जैन (मध्यप्रदेश) : सरकार हिंदूंची मंदिरे कह्यात घेते; परंतु एकही मशिद किंवा चर्च कह्यात घेत नाही. हिंदूंच्याच मंदिरांतील पैसे घेऊन मुसलमानांना हज यात्रेसाठी ८०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते; परंतु सिंहस्थ यात्रेसाठी हिंदूंना एक कवडीही अनुदान देण्यात येत नाही. उलट प्रत्येक यात्रेकरूकडून १० रुपये कर वसूल केला जातो, सरकार अमरनाथ यात्रेसाठी २ सहस्र रुपयांचा कर लावते. हा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सरकारचा हिंदूंवर अन्याय आहे. या सर्व समस्यांचा हिंदु राष्ट्रातच अंत होणार आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी तन, मन आणि धन अर्पण करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु दबंग सेनेच्या वतीने शंकरपूर येथे पू. (डॉ.) पिंगळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा लाभ सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *