Menu Close

हिंदूंची स्थिती पालटण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – कु. अदिती सुखटणकर, हिंदु जनजागृती समिती

प्रवचनाला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

कडवंतरा, एर्नाकुलम् (केरळ) : आज हिंदू आणि हिंदु धर्म यांच्यावर जेही संकट आले आहे, त्याला मूळ कारण अधर्म आहे. आज हिंदूंना धर्मशिक्षण नसणे आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणे यांमुळे हिंदूंची दयनीय अवस्था झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी प्रत्येकाने धर्माचरण करून ईश्वराचे चैतन्य आणि आध्यात्मिक बळ प्राप्त करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी एर्नाकुलम् जिल्ह्यातील कडवंतरा येथील ‘एस्.एन्.डी.पी’ या संघटनेच्या बैठकीत केले.

क्षणचित्रे

१. या प्रवचनात जीवनात प्रतिदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृतींचे शास्त्र आणि महत्त्व सांगण्यात आले.

२. आयोजकांनी यापुढेही असे कार्यक्रम घेण्याची इच्छा प्रदर्शित केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *