Menu Close

हिंदु महासभेच्या वतीने मशाल रॅलीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

जळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र त्यासाठी प्रत्येक हिंदूने अखंड हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन आणि प्रसंगी प्राण अर्पण करण्यास सज्ज रहावे, असे आवाहन हिंदु महासभेचे प्रदेश कार्यवाह अधिवक्ता गोविंद तिवारी यांनी केले. हिंदु महासभेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त येथे फेरी काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. फेरीच्या आरंभी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय ढेकळे, श्री. शिवराम पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील, हिंदु महासभा महिला आघाडीच्या सौ. वर्षा तिवारी यांनी प्रतिमेचे पूजन केले. फेरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचे चित्रण प्रसारित करण्यात आले. फेरीत सहभागी ३० युवकांच्या हातात पेटत्या मशाली होत्या. टॉवर चौक, नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्थानक मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ फेरीची सांगता झाली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी सांगितले की, सावरकरांचे विचार कृतीत आणले पाहिजेत. काही लोक हिंदु राष्ट्रात मुसलमानांचे काय होणार, असे विचारतात. जे न्यायप्रिय बिभीषण असतील, त्यांचे स्वागतच होईल.

या वेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण वाणी, डॉ. रामा पाटील, भगीरथ सोनी, सदाशिव ढेकळे, जिल्हा संघटक श्री. नारायण शेठ अग्रवाल यांच्यासह शेकडो सावरकरप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *