Menu Close

संभाजीनगर येथे भारताने क्रिकेट सामना जिंकल्यावर फटाके फोडणार्‍या हिंदूंना धर्मांधांकडून मारहाण

हिंदूंना वारंवार मारहाण व्हायला, हा पाक आहे का ? सरकार अशा धर्मांधांवर कठोर कारवाई का करत नाही ?

संभाजीनगर : इंग्लंडमधील चँपियन्स करंडकमधील क्रिकेट सामन्यामध्ये ४ जून या दिवशी भारताने पाकला हरवले. त्या निमित्ताने येथील शहानूरमियाँ दर्गा परिसरातील चौसर भागात रहाणार्‍या हिंदूंनी मध्यरात्री फटाके वाजवले. त्याचा राग धरून धर्मांधांच्या टोळक्याने हिंदूंवर आक्रमण करून त्यांना गंभीर मारहाण केली आणि त्यामध्ये ४ जण घायाळ झाले. (यावरून धर्मांधांची आक्रमणसिद्धताच दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी गुरु गोविंदसिंहपुरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट केला असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. (हीच घटना हिंदूंकडून घडली असती, तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे प्रविष्ट करून अटक करण्यात आली असती. यावरून पोलिसांचे अल्पसंख्यांकांविषयीचे लांगूलचालन आणि दुटप्पीपणाच दिसतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना वरील घटना कळताच त्यांनी घायाळांची विचारपूस केली. त्यानंतर चौसर भागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. (पाकप्रेमी धर्मांधांच्या उद्दामपणाला प्रत्युत्तर देणार्‍या शिवसैनिकांचे अभिनंदन ! असे धाडस केवळ शिवसैनिकच करू शकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यानंतर दानवे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकार्‍यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश टाक यांना भेटून ‘धर्मांध गुंडांना त्वरित अटक कारावी’, अशी मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *