Menu Close

कल्याणकारी राज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

मुंबई : आजच्या लोकशाहीमध्ये दुराचारी व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे सर्वत्र अनाचार बोकाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे व्यवस्थांवर अंकुश ठेवणारी व्यक्ती या देशात राष्ट्रभक्ती रुजवेल आणि कल्याणकारी राज्य निर्माण करेल. हे कल्याणकारी राज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. ‘न्यूज २४’ या वृत्तवाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गोवा येथे आयोजित अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’, या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

या चर्चासत्रात विहिंपचे श्री. विजयशंकर तिवारी, भाजपचे श्री. आय.पी. सिंह, ‘राबता काऊन्सिल’चे अध्यक्ष मौलाना अब्दुल रहमान आबिदी आणि एम्.आय.एम्. या राजकीय पक्षाचे असीम वकार सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन सय्यद सुहेल यांनी केले. श्री. वर्तक पुढे म्हणाले, ‘‘१०० कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदूंना स्वत:च्या हक्काचे एकही राष्ट्र नाही. म्हणून आम्ही १०० कोटी हिंदूंना ‘हिंदु राष्ट्र’ मिळवूनच देऊ.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *