Menu Close

हिंदु समाजाला ‘हिंदु राष्ट्रा’च्या विचारधारेत आणण्यासाठी वैचारिक धर्मयोद्धे बना ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

श्री लक्ष्मीनारायण सभागृह, रामनाथी, गोवा : इतिहास आणि संस्कृती यांचे विकृतीकरण हे संथ गतीने पसरणारे विष आहे. ते हिंदु समाजावर दूरगामी भयावह परिणाम करणारे आहे. ज्ञानशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून तिचा परिणाम राष्ट्रहितासाठी अधिक कालावधीकरता होतो. त्याकरता प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे हिंदुद्रोही विचारांचे खंडण करण्यासाठी योगदान देणे, ही काळाची आवश्यकता आहे. हाच विचारसंघर्ष संपूर्ण हिंदु समाजाला ‘हिंदु राष्ट्रा’च्या विचारधारेत आणणारा ठरणार आहे. वैचारिक आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येकाने हिंदु धर्माचे प्रवक्ता म्हणून ‘वैचारिक धर्मयोद्धा’ बनले पाहिजे. येथे उपस्थित संघटनांनी येत्या वर्षात २० धर्मप्रवक्ते बनवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्राचे सार मांडत होते.

या सत्रात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता वैद्य श्री. उदय धुरी, ‘ब्रेनवॉश रिपब्लिक’ या पुस्तकाचे लेखक श्री. मुनीश्‍वर सागर, ‘भारत रक्षा मंच’चे श्री. अनिल धीर आणि ‘सिक्स्थ न्यूज’ या तेलुगु वाहिनीचे संपादक श्री. भरतकुमार शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. या सत्राच्या वेळी बंगालमधील हिंदु आचार्य सभेचे डॉ. शिवनारायण सेन्, पू. उमेश शर्माजी हे उपस्थित होते.
२. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे हे सत्राचे सार सांगण्यासाठी व्यासपिठावर गेल्यावर तेथे बसलेले सर्वश्री अनिल धीर, मुनीश्‍वर सागर आणि भरतकुमार शर्मा हे तिघेही आदराने उठून बसले.
३. या वेळी ‘इतिहासरक्षण एवं प्रसार (विशेष व्यवस्था) अधिनियम’ त्वरित लागू करावा, यासाठी ९ ठरावांद्वारे जोरदार मागणी करण्यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *