Menu Close

लव्ह जिहाद आणि धर्मांतर या दोन मोठ्या समस्या हिंदूंसमोर असून कायद्याचा प्रभावी वापर आणि हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता !

डावीकडून यति मां चेतनानंद सरस्वतीजी, अधिवक्ता देवदास शिंदे, डॉ. कौशिकचंद्र मल्लिक, अधिवक्ता सुशील अत्रे, श्री. नागेश गाडे

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदूंसमोर लव्ह जिहाद आणि धर्मांतर या २ मोठ्या समस्या आहेत. या समस्यांच्या निराकरणासाठी कायद्याचा प्रभावी वापर, हिंदूंना धर्मशिक्षण देणे, धर्मांतरितांचे शुद्धीकरण करणे, हे मार्ग आवलंबावे लागतील, असे सार येथे चालू असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५ जून या दिवशी झालेल्या ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रातील सहभागी वक्त्यांनी मांडले.

वक्त्यांनी मांडलेले विचार . . .

१. . . . तर भारताची स्थिती मलेशियाप्रमाणे होईल ! – अधिवक्ता देवदास शिंदे, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान, पुणे

२. हिंदू स्वत:मध्ये जोपर्यंत क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

३. लव्ह जिहादच्या विरोधात लढण्यासाठी कायद्याचा प्रभावी वापर आवश्यक ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय प्रबोधिनी

४. धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरही भर देणे आवश्यक ! – श्री. नागेश गाडे, हिंदु जनजागृती समिती

५. साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतर ! – डॉ . कौशिकचंद्र मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

सत्रात संमत करण्यात आलेले ठराव

१. केंद्र शासनाने सर्व राज्यांना लागू होणारा धर्मांतरबंदी कायदा करावा.

२. वनवासी क्षेत्रात ख्रिस्ती मिशनर्‍यांना अनाथालय, तसेच अन्य कोणतेही सेवाकार्य करण्यास प्रतिबंध करावे.

क्षणचित्रे

१. या वेळी उपस्थितांनी ‘स्वामी श्रद्धानंद की जय हो, प.पू. भाऊ मसुरकरकी जय हो, मनु महाराज की जय हो’, अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या.

२. डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करून केला.

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *