पाकमधील हिंदूंना कोणीच वाली नाही, तर भारतातील मुसलमानांसाठी स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्या राजकीय पक्षांसह आणि संघटनांसह सर्वच तत्पर असतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2017/06/pakistan-supreme-court.jpg)
इस्लामाबाद : पाकिस्तान हिंदू काऊन्सिलने अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून बळजोरीने होणारे धर्मांतर आणि विवाह यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. काऊन्सिलने या प्रकरणात न्यायालयाने नोंद द्यावी, अशी मागणी केली आहे. पाकच्या सिंध प्रांतात गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी थारपारकर जिल्ह्यात १६ वर्षांच्या राविता मेघवाड हिचे अपहरण करून तिचे धर्मांतर करून तिच्यापेक्षा दुप्पट वयाने मोठ्या असणार्या मुसलमानाशी तिचा विवाह करण्यात आला. या घटनेवर काऊन्सिलने चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्या वेळी राविता हिच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात