Menu Close

यावल (जिल्हा जळगाव) : भारत मे रहेना है, तो या ख्वाँजा कहना है, असे लिहिलेला टिपू सुलतानचा फलक धर्मांधांनी लावला

हिंदुबहुल महाराष्ट्रात अशा प्रकारचा फलक लावला जाणे ही घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

हिंदूंच्या भावना भडकवणारा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा फलक

जळगाव : येथील यावल शहरातील टिपू सुलतान चौकात रमजान ईदच्या निमित्ताने धर्मांधांकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा फलक लावण्यात आला होता. त्यावर भारत मे रहेना है, तो या ख्वाँजा कहना है, असे लिहून हिंदूंच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला होता.  फलकाच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, हे लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष श्री. अतुल पाटील यांनी पोलीस निरीक्षक श्री. बळीराम हिरे यांच्याशी मध्यस्थी केली आणि फलक तातडीने काढण्यास भाग पाडला. (हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन तातडीने फलक काढण्यास भाग पाडणारे धर्माभिमानी माजी नगराध्यक्ष श्री. अतुल पाटील यांचे अभिनंदन ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *