Menu Close

बंगालचा बांगलादेश होण्याआधी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

नाशिक : बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंचे रक्षण करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केली. या वेळी रणरागिणीच्या श्रीमती वैशाली कातकाडे यांनीही त्यांचे मत मांडले.

आंदोलनात संगमनेर शहर उपप्रमुख बजरंग दलाचे श्री. सचिन कानकाटे, मालेगाव येथून सहभागी झालेले धर्मप्रेमी सर्वश्री संदीप वाघ, दत्तात्रेय अहिरराव, गणेश खैरनार, माणिक खैरनार, अतुल खैरनार, रवींद्र खैरनार, संगमनेर येथून सहभागी झालेले धर्मप्रेमी सर्वश्री मयुर शेलार, अविनाश वाव्हळ, संतोष पठाडे, तसेच सनातन संस्था, रणरागीणी शाखा आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रप्रेमींच्या मागण्यांचे निवेदन नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना देण्यात आले.

क्षणचित्रे : शाळांमधील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या. एका कीर्तनकारांनी आंदोलनाचा विषय जाणून घेऊन आंदोलनांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *