Menu Close

रामजन्मभूमीचा वाद भडकवण्यासाठी मौलवींना पाकिस्तानातून पैसा ! – शिया वक्फ बोर्डाचा आरोप

शिया वक्फ बोर्डाला जी माहिती मिळते ती भारतीय गुप्तचर संस्थांना का मिळत नाही आणि ते या मौलवींवर कारवाई का करत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जम्मू : भारतामध्ये रामजन्मभूमीचा वाद भडकवण्यासाठी देशातील मौलवींना पाकमधून पैसा दिला जात आहे, असा आरोप शिया वक्फ बोर्डाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष सईद वसीम रिझवी यांनी केला आहे. या प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात मुसलमानांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकांचा पाकशी थेट संबंध आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

रिझवी यांनी म्हटले आहे की, या वादावरून देशात असलेल्या शांततेचा भंग करण्यासाठी काही लोक पाकच्या इशार्‍यावर काम करत आहेत. हे लोक पाकच्या नादाला लागून धार्मिक सूत्रे उपस्थित करून देशाला अस्थिर करू पहात आहेत. या सूत्रावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही; कारण यात पाकचा मोठा हात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *