Menu Close

कल्याणमधून बेपत्ता झालेला तरुण इसीसच्या संपर्कात असल्याचा आतंकवाद विरोधी पथकाला संशय !

कल्याण : कल्याण शहरातून वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेला तरुण युसूफ अख्तर शेख हा आतंकवादी संघटना इसीसच्या संपर्कात असल्याचा कयास आतंकवाद विरोधी पथकाने व्यक्त केला आहे. युसूफची आई फातिमा हिने सांगितले की, तिच्या मुलाला नमाज पठणाचे वेड होते. तसेच तो स्क्रिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचार चालू होते. यूसूफ हा ११ मे २०१६ या दिवशी बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता होण्यापूर्वी त्याला एका व्यक्तीचे सारखे भ्रमणभाष येत होते. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याला येणार्‍या व्यक्तीचे भ्रमणभाष बंद झाले. युसूफ बेपत्ता झाल्यावर आंध्रप्रदेशातून नल्लोर येथून एका व्यक्तीचा भ्रमणभाष आला. त्या भ्रमणभाषवरून तुमचा मुलगा आमच्या कह्यात असल्याचे कळवण्यात आले. ही माहिती युूसूफची आई फातिमा हिने पोलिसांनी दिली. पोलीस आंध्रप्रदेशातील नल्लोर गावी पोहोचले; मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. युसूफ हरवल्यापासून त्याचे कुटुंबिय त्याचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *