Menu Close

राजस्थानमध्ये लग्नाच्या गाडीतून गोतस्करी

गोरक्षकांना समाजकंटक ठरवणारे, गोतस्करांच्या या हुशारीच्या विरोधात काहीच बोलणार नाहीत !

जयपूर – राजस्थानच्या मेवात येथे पोलिसांनी लग्नाच्या वाहनातून गोतस्करीचा प्रकार उघड केला आहे. या तस्करांनी एयूव्ही गाडीमध्ये ४ गायींना भरले होते आणि वरून तिला लग्नाच्या गाडीसारखे फुलांनी सजवले होते. या गाडीला किशनगड बास येथे अपघात होऊन यातील ३ गायींचा मृत्यू झाला. यामुळेच त्यांचा हा कट समोर आला. अपघातानंतर चालक पळून गेला.

पोलिसांनी सांगितले की, राजस्थानच्या हरियाला लागलेल्या सीमेवर वाहनांची तपासणी होत असल्याने तस्करांनी हा नवीन प्रकार चालू केला आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *