Menu Close

बांगलादेशमध्ये हिंदु महिलेचे अपहरण आणि बळजोरीने धर्मांतर

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदु ! भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कसे करणार ? यासाठी आता सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका : बांगलादेशच्या आदमदिही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय हिंदु महिलेचे काही धर्मांधांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री अपहरण केले. या हिंदु महिलेचे पती अपंग असून सदर महिला घराच्या बाहेर आली असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या मिझानूर रहमान आणि त्याच्या साथीदारांनी तिचे अपहरण केले. हिंदु महिलेचे बळजोरीने धर्मांतर करणे आणि तिच्यावर बलात्कार करणे या दुष्ट हेतूने धर्मांधांनी तिला पळवले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे धर्मांध तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत होते. त्याविषयी सदर हिंदु महिलेने आदमदिही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते, असे  वृत्त दैनिक कराटोआ मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

या अपहरणाविषयी बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे प्रतिनिधी बिकाश शारनाकर यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना कल्पना दिली. अधिवक्ता घोष यांनी आदमदिही पोलीस ठाण्याचे अधिकारी महंमद वहिदूजमान यांच्याशी संपर्क साधला. पीडित हिंदु महिलेची तातडीने सुटका करण्यात यावी आणि अपहरणर्त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधिवक्ता घोष यांनी केली. त्या वेळी अपहरणकर्त्यांना अटक करून पीडित हिंदु महिलेची सुटका करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलीस अधिकार्‍याने अधिवक्ता घोष यांना दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *