Menu Close

नवी मुंबई येथील ओरिसा भवनात ॐ असलेल्या लाद्या न काढल्यास तीव्र आंदोलन करणार

विहिंप आणि बजरंग दल यांची चेतावणी

धर्मरक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या विहिंप आणि बजरंग दल यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

नवी मुंबई : नवी मुंबईत प्रत्येक राज्याचे भवन आहे. ओरिसा राज्याच्या भवनाच्या गच्चीवर लावलेल्या विविध रंगी लाद्यांच्या तुकड्यांत काही ठिकाणी तुकडे जोडून ॐ कार बनवण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ओरिसा भवनाच्या अधिकार्‍यांना भेटून हे तुकडे काढून तेथे नवीन तुकडे लावण्यासाठी निवेदन दिले. (हिंदुबहुल महाराष्ट्रात अशा प्रकारे निवेदन द्यावे लागणे दुर्दैवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

ॐ हा हिंदु धर्मियांच्या आस्थेचा विषय आहे. ओरिसा भवन व्यवस्थापनाने हे कृत्य करून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासंदर्भात आम्ही निवेदन दिले आहे. ३ दिवसांत ॐ असलेल्या लाद्या काढून न टाकल्यास विहिंप आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करेल, अशी चेतावणी विहिंपचे श्री. कृष्णा बांदेकर यांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *