Menu Close

उदयपूर (राजस्थान) येथे कायद्यांना न जुमानणार्‍या धर्मांधांचा वाढता उद्दामपणा ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

उदयपूर (राजस्थान) येथे काही दिवसांपूर्वी ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात एका धर्मांधाची हत्या झाल्यामुळे धर्मांधांनी तेथे दंगलसदृश्य स्थिती निर्माण केली. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी तेथे कलम १४४ लागू करून संचारबंदी करण्यात आली आहे. असे असतांनाही धर्मांधांकडून संचारबंदीचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. हे धर्मांध रस्त्यावर उतरून ‘इस देश मे रहना होगा, तो ‘अल्ला हू अकबर’ कहना होगा ।’ अशा धमकीवजा घोषणा देत आहेत. या भागात हिंदूंना त्यांची दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले जात आहे आणि धर्मांधांची दुकाने उघडी ठेवली जात आहेत.

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांनाही पोलिसांकडून या धर्मांधांवर कारवाई होत नसल्यामुळे हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *