Menu Close

हिंदू संघटित झाल्यास हिंदु राष्ट्र येईलच ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह

धुळे येथील विशाल हिंदु धर्मजागृती सभेला २२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह

धुळे : आज मुसलमान लोकसंख्या ‘हम पाच, हमारे पचास’ या प्रचंड गतीने वाढत आहे, तर हिंदूंचे केवळ ‘हम दो, हमारे दो’ या पद्धतीने चालू आहे. मुसलमानांची संख्या अशीच वाढत राहिल्यास उद्या हिंदूंना जगणे कठीण होईल. लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. तसेच जैन, मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मराठी यांच्यासह हिंदूंच्या अन्य जातींतील मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राद्वारे पळवून नेले जात आहे. या फसवलेल्या मुलींचे नंतर धर्मांतर करून त्यांची संपत्ती हस्तगत करण्याचे आणि त्यांना मूल जन्माला घालणारे यंत्र (मशीन) समजून स्वतःच्या पंथाची लोकसंख्या वाढवण्याचे षड्यंत्रच जिहादी अन् आतंकवादी यांनी रचलेले आहे. हे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ आमदार आणि गोरक्षक श्री. टी राजासिंह यांनी धुळे येथे हिंदु धर्मजागृती सभेत केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गिंदोडिया कंपाऊंडच्या मैदानामध्ये २५ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. सभेत अन्य वक्त्यांचीही भाषणे झाली. या सभेला २२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

श्री. टी. राजासिंह पुढे म्हणाले, ‘‘संघटनामध्ये पुष्कळ शक्ती आहे. हिंदूसंघटन झाल्यास लव्ह जिहाद रोखण्यासह राममंदिराची उभारणीही हिंदू करतील. हिंदू संघटित झाल्यावर हिंदु राष्ट्र आणण्यापासून कोणीही हिंदूंना रोखू शकणार नाही; मात्र आगामी काळात जर हिंदू संघटित झाले नाहीत, तर त्या काळात धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या आक्रमणांपासून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *