धर्मरक्षक संघटनेचे तृतीय प्रांतीय हिंदू अधिवेशन
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2018/01/hindu-adhiveshan.jpg)
भोपाळ : हिंदुहितासाठी काही करू इच्छिणार्यांनी आता हिंदु राष्ट्रासाठी संघटकाची भूमिका पार पाडायला हवी. आपण जेथे रहातो, त्या भागातील अडचणींमध्ये हिंदूंना साहाय्य करून त्यांच्यामध्ये एक विश्वासाची भावना निर्माण करायला हवी. समविचारी संघटनांसह आपले संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करायला हवे. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया घातला जाणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते येथील धर्मरक्षक संघटनेच्या वतीने आसुदानी चॅरिटेबल ट्रस्टच्या धर्मशाळेत आयोजित केलेल्या तृतीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्या दिवसाच्या सत्रात बोलत होते. या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी धर्मरक्षणाच्या कार्यातील साधनेचे महत्त्व या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रकार्यापेक्षा धर्मकार्य श्रेष्ठ ! – श्री. विनोद यादव, संस्थापक-अध्यक्ष, धर्मरक्षक
या वेळी धर्मरक्षक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. विनोद यादव म्हणाले की, ख्रिस्ती व्यक्तीला संपूर्ण जग ख्रिस्तमय व्हावेसे वाटते. प्रत्येक मुसलमान व्यक्तीला सर्व जग इस्लाममय व्हावेसे वाटते. हिंदू मात्र हिंदु राष्ट्राची मागणी करत नाही. हिंदू मानवता, गोरक्षण, धर्मांतर, राष्ट्ररक्षण अशा छोट्या छोट्या सूत्रांची चर्चा करतात; पण ही सर्व शिकवण ज्या धर्माने दिली, त्या धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करावे लागतील.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी दैनंदिन जीवनातील धर्माचरणाचे महत्त्व प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले. समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे हे समारोप सत्रात मार्गदर्शन करतांना म्हणाले, या अधिवेशनात सर्वांमध्ये एक परिवाराची भावना जागृत झाली. पुढे येणार्या संकटकाळात एकमेकांना साहाय्य करून धर्माचे रक्षण करूया. देवाने धर्माच्या बाजूने लढण्यासाठी आपली निवड केली आहे. यात विजयी होऊन आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. यासाठी सर्वप्रथम ईश्वराचे भक्त बनून त्याची कृपा संपादन करायला हवी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात