Menu Close

परतूर (जिल्हा जालना) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि जाळपोळ

चौकाचे नामकरण करून हिरवे झेंडे लावायला आणि दंगली घडवायला परतूर पाकिस्तानात आहे काय ? हिंदूंच्या शांततेत चालणार्‍या मिरवणुकांवर सातत्याने आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ते हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक)

जालना : जिल्ह्यातील परतूर येथे शांततेत चालू असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून जाळपोळ केली. यात १० ते १२ जण घायाळ झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक ‘दशमले’ चौकात आली असता चौकात असलेल्या हिरव्या झेंड्याला धक्का लागल्याचे निमित्त करून उद्दाम धर्मांधांनी दीड घंटा धुमाकूळ घातला. या वेळी पोलीस बंदोबस्तही अत्यल्प असल्याने पोलिसांची ही पळापळ झाली. (धर्मांधांची दंगल रोखू न शकणारे पोलीस जिहादी आतंकवाद्यांपासून देशाचे रक्षण कसे करणार ? यावरून पोलिसांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जात असेल, याची कल्पना येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

धर्मांधांनी हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करत दगडफेक केली. दगडफेकीनंतर दुचाकी, चार रिक्शा, पानदुकान, मंडप दुकान यांसह पोलीस ठाण्यासमोरील एक उपाहारगृहही जाळले. (धर्मांध पोलीस ठाण्यासमोरील उपाहारगृह जाळत असतांना पोलीस काय करत होते ? पोलीस ठाण्यासमोरील उपाहारगृह जाळण्याचे धर्मांधांचे धाडस होते, यावरून त्यांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा दुष्परिणाम राजकारणी जाणतील का ?

ज्या चौकात धर्मांधांनी धुडगूस घातला, त्या चौकाचे नगरपरिषदेने धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी ‘मंगलशहा चौक’ असे नामकरण केले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर हिरवे झेंडे लावण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *