Menu Close

केवळ हिंदु राष्ट्रामुळेच देशाची स्थिती पालटू शकते ! – विजय कुमार, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून सौ. आरती मोगेर, श्री. पुंडलिक पै आणि श्री. विजय कुमार

जद्कल, कुंदापूर (कर्नाटक) : हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी प्रत्येक हिंदूने सुराज्य अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ हिंदु राष्ट्रामुळेच देशाची स्थिती पालटू शकते, असे प्रतिपादन श्री. विजय कुमार यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जद्कल, कुंदापूर येथे नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा झाली. या सभेला सनातन संस्थेच्या सौ. आरती मोगेर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पुंडलिक पै आणि समितीचे उडुपी समन्वयक श्री. विजय कुमार उपस्थित होते.

या वेळी आरती मोगेर म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्यानंतर प्रथमच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी देशात चर्चा चालू झाली आहे. साधना केल्याने आपण अत्यंत अल्प काळात ईश्‍वरी कृपा प्राप्त करू शकतो.’’ श्री. पुंडलिक पै म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही सरकारकडून जनतेच्या पैशातून मोठ्या प्रमाणात विज्ञापनांवर व्यय करण्यात येत आहे. याविषयी जागृती करणे आवश्यक आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *