Menu Close

राष्ट्रीयत्व हरवलेला हिंदु समाज हीच खरी देशाची समस्या ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

२८ मार्च या दिवशी होणार्‍या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन

याविषयी सरकार आणि सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

मिरज : सध्या राष्ट्रीयत्व हरवलेला हिंदु समाज हीच खरी देशाची समस्या आहे, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले. २१ मार्च या दिवशी गोरे मंगल कार्यालयात मार्गदर्शन करतांना पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘या वर्षाअखेर आम्ही सुवर्ण सिंहासनाची स्थापना करणार आहोत. त्याच्या रक्षणाची ‘खडा पहारा’ योजनाही सिद्ध आहे. कोरेगाव भीमा दंगलीशी माझा काही संबंध नसतांनाही निवडणुकांच्या संदर्भातून माझे नाव जोडले जात आहे. तरी हिंदू ऐक्याचा आविष्कार दाखवण्यासाठी २८ मार्च या दिवशी होणार्‍या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.’’

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलन, शिवसेना, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, लिंगायत समाज, अधिवक्ता संघटना, ब्राह्मण पुरोहित संघ, व्यापारी संघटना, राजपूत संघटना, हिंदु जनजागृती समिती यांसह विविध संस्था, संघटना यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी मोर्च्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *