Menu Close

जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यास भारत सरकार बांधील : प्रा. रामेश्‍वर मिश्र

प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी फेसबूकवरून प्रसारित केलेले विचार


‘भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांतील काही बुद्धीजीवी भ्रम पसरवण्याचे काम करत आहेत; मात्र ही संज्ञा मनमानीपणे वापरणे चुकीचे आहे. स्वतःच्या नागरिकांचे विशेषतः मुख्य प्रवाहातील नागरिकांचे रक्षण करण्यास वचनबद्ध असलेल्या राज्याला (‘स्टेट’ला) राष्ट्रावर सत्ता गाजवण्याचा अधिकार आहे. येथेही ‘अल्पसंख्य’ या संज्ञेचा वापर ‘बहुसंख्य’च्या संदर्भात वापरला जातो. राष्ट्रातील मुख्य प्रवाहात असलेल्या समाजाचे रक्षण करणे, हे राज्याचे प्रथम कर्तव्य आहे. या अनुषंगाने जगभरातील हिंदूंचे रक्षण करणे, हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. तत्कालीन काँग्रेसने बहुसंख्यांकांच्या संदर्भात असलेल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याने ती गुन्हेगार आहे. तथापि जगभरातील हिंदूंचे रक्षण करणे, हे भाजप सरकारचे दायित्व असून ते त्याने पार पाडावे. पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखले पाहिजेत. तेथील शासनांना हिंदूंचे रक्षण करण्याविषयी कठोर समज दिली पाहिजे. अलीकडेच बांगलादेशातील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या नवीन घराचे बांधकाम पाडण्यात आले, तसेच तेथील साहित्य लुटण्यात आले. भारत सरकारने याविषयी तात्काळ कृती करणे आवश्यक आहे.’

– प्रा. रामेश्‍वर मिश्र, माजी सल्लागार, सांस्कृतिक विभाग, केंद्र सरकार.

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *