Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला आगरा येथे निवेदन

पाकिस्तानमधून आलेल्या हिंदु शरणार्थींना परत पाठवू नये !

आगरा (उत्तरप्रदेश) : पाकिस्तानमधून आलेल्या हिंदु शरणार्थींना कोणत्याही स्थितीत पाकिस्तानमध्ये परत पाठवू नये, त्यांना मुलभूत सुविधा देण्यात याव्यात आणि त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अगरा शहर दंडाधिकारी के.पी. सिंह यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये सरकारने अल्पसंख्यांकांसाठी अधिकोषांमध्ये वेगळ्या काऊंटरची सुविधा उपलब्ध करून धार्मिक भेदभाव करू नये, अशीही मागणी करण्यात आली. या वेळी हिंदु सेनेचे सर्वश्री उत्सव शर्मा, नवीन भरद्वाज, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री ठाकुर सिंह, शुभम्, अजय अग्रवाल, संजीव, सौ. नीलम यादव, सौ. मोनिका सिंह आदी उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *